मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Saturday, August 2, 2025

बदल्यांचं कशाला टेन्शन?

 बदल्यांचं कशाला टेन्शन?


बदल्यांचं कशाला टेन्शन?
आहे तिथं मस्त रहायचं...
झाल्या तर झाल्या बदल्या
हसतखेळत ज्ञानदान करायचं....!!

होईल तेंव्हा होईल बदली
सदा तत्पर आणि तयार रहायचं
कुठेही सेवाच करायची आहे ना
मग ऑर्डर येईपर्यंत सेवाच करायचं....!!

शासनाचे धोरण वेगवेगळी
आपण कशाला मधात पडायचं
ज्याचं नडलं त्याने मग 
हळूच कोर्टात जायचं.....!!

आपण खरंच नशिबवान आहोत
पुण्याचं कामं सदा करायचं
आलाच वाट्याला जर का संघर्ष
धैर्याने त्याला सामोरं जायचं....!!

आज नाही तर उद्या होतीलच बदल्या
त्याचं टेन्शन आतापासून नाही घ्यायचं
खरं सुख विद्यार्थ्यांतच आहे ना
तिथेच आणि त्यांच्यातच रमायचं...!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
 कोकलगाव

No comments:

Post a Comment

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...