बदल्यांचं कशाला टेन्शन?
आहे तिथं मस्त रहायचं...
झाल्या तर झाल्या बदल्या
हसतखेळत ज्ञानदान करायचं....!!
होईल तेंव्हा होईल बदली
सदा तत्पर आणि तयार रहायचं
कुठेही सेवाच करायची आहे ना
मग ऑर्डर येईपर्यंत सेवाच करायचं....!!
शासनाचे धोरण वेगवेगळी
आपण कशाला मधात पडायचं
ज्याचं नडलं त्याने मग
हळूच कोर्टात जायचं.....!!
आपण खरंच नशिबवान आहोत
पुण्याचं कामं सदा करायचं
आलाच वाट्याला जर का संघर्ष
धैर्याने त्याला सामोरं जायचं....!!
आज नाही तर उद्या होतीलच बदल्या
त्याचं टेन्शन आतापासून नाही घ्यायचं
खरं सुख विद्यार्थ्यांतच आहे ना
तिथेच आणि त्यांच्यातच रमायचं...!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
कोकलगाव
No comments:
Post a Comment