मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Monday, April 13, 2026

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन 

उपक्रमशील व तंत्रस्नेही आदर्श शिक्षिका मिनाक्षी नागराळे मॅडम यांच्या ५ व्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन उद्याला शिवाजी हायस्कूल वाशिम येथे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे.वत्सगुल्मी या काव्यसंग्रहाला प्रस्तावना सुप्रसिद्ध लेखक बाबाराव मुसळे सरांची लाभली आहे तर पाठराखण प्रसिद्ध लेखक ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मा.एकनाथ आव्हाड सर यांनी केली आहे.
      मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे यांचे यापुर्वीचे साहित्य म्हणजे त्यांचा पहिला काव्यसंग्रह चिमणी पाखरं,तसेच सुकळी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या कवितांचा बालकवितासंग्रह -उमलती फुले,(महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचा पहिला काव्यसंग्रह व पहिले बालकविसंमेलन मिनाक्षी नागराळे यांनी सर्किट हाऊस वाशिम येथे घेतले होते.तिसरे पुस्तक म्हणजे 'स्वराज्याचे मावळे' हा पहिला ऐतिहासिक काव्यसंग्रह जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत मावळ्यांवर झाला.त्यांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास कवितेच्या रूपात मांडण्यात आला.याच स्वराज्याचे मावळे या काव्यसंग्रहाची नोंद महाराष्ट्र राज्य शासनाच्या मुंबई येथील ग्रंथालयात निवड झाली तसेच महाराष्ट्र बुक्स ऑफ रेकॉर्ड मध्ये सुद्धा नोंद झाली.या आगळ्यावेगळ्या काव्यसंग्रहाचे साहित्यप्रेमीनी भरभरून कौतुक केले. त्यानंतर लॉकडाऊन काळात महाराष्ट्रभरातून पुस्तके समिक्षणासाठी भेट येत असतं त्या पुस्तकावरचे समिक्षण करून त्याचा समकालीन समिक्षा ग्रंथ निर्माण झाला.या ग्रंथाचा उपयोग पिएचडी करणा-या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयोगी ग्रंथ म्हणून उपयोगी पडणार आहे.
              शिक्षकांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून शिक्षकांसाठी वेगवेगळ्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.प्रत्येक तालुक्यातून कवितेसाठी तीन नंबर काढण्यात आले होते.ते शिक्षक तालुक्यातून  विभाग स्तरासाठी पात्र ठरले होते.त्या निवडक कवितांचा पाच जिल्ह्यांतील शिक्षकांच्या स्पर्धा या वाशिम जिल्ह्यात घेण्यात आल्या त्यामुळे या काव्यसंग्रहाला वत्सगुल्मी हे नांव देण्यात आले.
वाशिम जिल्ह्याला साहित्यिक वारसा राजा वाकाटक ते वत्सगुल्मीच्या काळापासूनचा असल्याने आणि वत्सगुल्मी ही एक साहित्यशैली असल्याने वाशिमचे जुने नांव वत्सगुल्म असल्याने या काव्यसंग्रहाला कवयित्री /लेखिका,समिक्षिका मिनाक्षी नागराळे यांनी खूप विचारपूर्वक दिले आहे.
     मिनाक्षी नागराळे यांना सावित्रीमाई फुले कवयित्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने २०२३/२४ मध्ये मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या, शिक्षणमंत्र्यांच्या हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.तसेच शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती मध्ये जिल्हास्तरीय विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.आजपर्यंत मिनाक्षी नागराळे यांना ९१ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.९२,व ९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये मिनाक्षी नागराळे यांच्या कवितेची निवड झाली होती.मिनाक्षी नागराळे यांना साहित्यिक, शैक्षणिक, सामाजिक,कार्यासाठी आजपर्यंत विविध पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.शिक्षकी पेक्षात तर अग्रेसर असणाऱ्या तळागाळातील गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाचा लळा लावणा-या या ध्येयवेड्या शिक्षिकेला उद्याच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाच्या प्रकाशनाच्या हार्दिक शुभेच्छा.... खूप खूप अभिनंदन

Wednesday, April 1, 2026

१३) केल रशियन भाजी (आयुर्वेदिक कविता)

 १३) केल रशियन भाजी(आयुर्वेदिक कविता)

ही एक रशियन भाजी 
केल तिचे नाव आहे 
त्यात कोणकोणते पौष्टिक घटक 
मिनू त्याचा संदर्भ पाहे....!!

विटामिन ए विटामिन सी 
 विटामिन के व कॅल्शियम असे भरपूर 
पोटॅशियम व मॅग्नेशियम 
 आणि काय ब्रोहाइड्रेट्सचे प्रमाण पुरेपूर ...!!

हृदयासाठी खूप फायदेशीर 
भरपूर असतो फायबर 
कोलेस्ट्रॉल कमी करतं आणि 
आटोक्यात ठेवतो ब्लडप्रेशर ....!!

अँटिऑक्सिडेंट्स मुळे 
फॅट होते कमीत कमी 
जुने आजार पळून जातील 
मिळेल  निरोगी शरीराची हमी....!!

 भरपूर कॅल्शियममुळे 
हाडे होतात खूप मजबूत 
कॅन्सर पासून बचाव होतो 
केल जणू आरोग्याचा दूत....!!

 रोगप्रतिकारशक्ती वाढवते 
विटामिन ए मुळे सुधारते डोळ्यांची दृष्टी 
आयुर्वेदाचा खजिना अमाप आणि 
औषधी गुणांनी युक्त भरली सृष्टी.....!!

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक 
शाळा जांभरून नावजी

चिमणी दिनानिमित्त कविता (२२ मार्च २०२६)

 चिमणी दिनानिमित्त कविता ( २२ मार्च २०२६)

येता चिवचिव करी
डोळे इवले इवले 
देह सानुला सानुला 
चिमुकली ती पाऊले....

लुकलुक मान हले 
चिमणी दारात येते
टिपुणीया सारे दाणे 
उडूनिया मग जाते.....

इवलासा जीव तिचा
होई कासावीस सदा
पाहुणी जणू तीच
तीची वेगळी ती अदा....

ठेवा येळणीत पाणी 
बांधा झाडाला येळण 
थंडगार सावलीत 
दाणे टिपत खेळणं....!!

इवलाश्या गे चोचीत 
घेई इवलासा घास 
टकमक पहातसे 
कुणी आहे आसपास?

दाणे टिपाया येईल 
आला कडक उन्हाळा
तिचा व्याकुळला जीव
कधी येई पावसाळा....

खरकटे नाही दारी
घेती बंगल्याने जागा
चिमणी दिनानिमित्त 
जबाबदारीने वागा......

चिमणी दिनानिमित्त 
सा-यांना शुभेच्छा 
इवलासा जिवाची रे 
पूर्व कर सा-या इच्छा

कवयित्री 
मिनाक्षी नागराळे मॅडम वाशिम

१२) बहुगुणी बेलपत्र (आयुर्वेदिक कविता)

 १२)  बहुगुणी बेलपत्र   (आयुर्वेदिक कविता)

बहुगुणी बेलपत्र 
आयुर्वेदामध्ये महत्त्व फार
बेलाचे पानांच्या खाण्याने 
बरेच कमी होतात विकार....!!

पचनसंस्था सुधारते 
कमी होतो अतिसार 
बद्धकोष्ठता दूर करी 
कमी होईल मधुमेहाचे आजार ....!!

मधुमेहावरचा रामबाण उपाय 
वाढते रोगप्रतिकारक शक्ती 
बेलपत्राच्या पूजनाने मग 
वाढेल महादेवाची भक्ती ......!!

शिवाला अत्यंत प्रिय असे 
धार्मिक पूजेमध्येही तितकेच महत्त्व 
बेलपत्रामुळे शरीराला ऊर्जा मिळे
कफ, वात दूर करे बेलाचे सत्व....!! 

तीन पानांचे बेल हे 
औषधी गुणांची खाण
उन्हाळ्यात तहान शमवी
महादेवाच्या पूजेला सर्वात आधी मान...!!

बेलपत्राच्या सरबताने  बघा
उन्हाळ्यात पोटास मिळे थंडावा 
मुळव्याधीमध्ये आराम मिळतो 
असे गुणकारी बेलाचे झाड लावा....!!

कवयित्री 
मिनाक्षी विजाई पांडुरंग नागराळे 
जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा 
🏫 जांभरून नावजी

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...