मिनू
Friday, January 23, 2026
मिनूच्या कविता...: शहाणपण थोडे जप पुन्हा
मिनूच्या कविता...: शहाणपण थोडे जप पुन्हा: शहाणपण थोडे जप पुन्हा शब्द आहेत अमुल्य वेडे जपून वापर त्याचा कर पुन्हा शब्द असे दुधारी तलवार सये निर्मळ मनाचा काय गुन्हा....!...
सोड सोड हेवेदावे (अष्टाक्षरी काव्य)
सोड हेवेदावे (अष्टाक्षरी)
सोड सोड हेवेदावे
सारे जगतासी ठावे
नको काढू उणेदुणे
सदा आनंदी रहावे....!!
काय आपण करावे
आपुल्या मना पुसावे
सत्याच्या शोधात सखे
सदा आनंदी असावे....!!
ज्याचे त्याचे असे माप
आपण का ते तोलावे
कुणा दुखवेल असे
नाही शब्द ते बोलावे....!!
सोड सोड हेवेदावे
जे जे आपणासी ठावे
ते इतरांसी सांगावे
सदा खरे ते बोलावे....!!
सोड सोड हेवेदावे
आपुले कर्म ते करावे
ज्याचे त्याचे तैसे कर्म
ज्याचे त्यानेच भरावे.....!!
आकाशाला गवसणी
भाग्य थोर तुझे ठरावे
सदा सा-यांचे बनून
सुख जीवनी पुरावे....!!
एकमेकांच्या आयुष्यात
सुगंधीरूपी फुलावे
प्रेमसागरात डुबू निया
हळुवार तू डुलावे.....!!
कार्याची ती गोड थाप
कधी नाही विसरावे
मरावे परी सखये
किर्तीरूपी तू उरावे....!!
किर्तीरूपी तू उरावे.....!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम
Wednesday, January 21, 2026
शहाणपण थोडे जप पुन्हा
शहाणपण थोडे जप पुन्हा
शब्द आहेत अमुल्य वेडे
जपून वापर त्याचा कर पुन्हा
शब्द असे दुधारी तलवार सये
निर्मळ मनाचा काय गुन्हा....!!
अति महत्त्वकांक्षी होणं
खरंच चांगले नाही
तुला मात्र अस्तित्व दाखवण्याची
फार फार घाई.....!!
लाख मोलाची मायेची माणसं
परिघात जपून ठेवं पुन्हा
कोणास ठाऊक कोण कसा विचार करतो
तिथे शब्दांचा काय गुन्हा?
वेळ निघून गेल्यावर कळेल
मग अपराधी वाटेल पुन्हा
तुझे मन तुलाच विचारेल प्रश्न
तिथे मग शब्दांचा काय गुन्हा?
अति उतावळेपणा नाही कामाचा
विचार जाब स्वतःला पुन्हा
जाणवतील तुजला सखे सतत
आपलेपणाच्या जपलेल्या खुणा....!!
नाही कुणी वेडे इथे
वेळ प्रत्येकाची येते पुन्हा
तुझे तु तूलाच विचार ना
अति महत्त्वकांक्षी हाच गुन्हा
अति महत्त्वकांक्षी होणं हाच गुन्हा....!!
कवयित्री
मिनाक्षी नागराळे
वाशिम
Tuesday, January 13, 2026
कवी काय असतो?
कवी काय असतो?
कवी असतो मुक्त मनाचा
कवी असतो धनी शब्दांचा
कवी असतो निरंतर लिहीणारा
कवी असतो मनातला बोलणारा....
कवी असतो वाचा फोडणारा
कवी असतो कवितेत जगणारा
कवी असतो नियमात वागणारा
कवी असतो कवितेला जागणारा....
कवी असतो मुक्त शब्दांना गुंफणारा
कवी असतो आशेत जगणारा
कवी असतो जागवणारा
कवी नसतो कधीच रागावणारा.....
कवी असतो निरंतर प्रवाह
कवी असतो स्वच्छंद
कवी असतो शब्दांवर प्रेम करणारा
कवी असतो शब्दांच्या प्रेमात पडणारा...
कवी नसतो कधीच रडणारा
कवी असतो कवितेत जगणारा
कवी असतो सदा आशावादी
कवींच्या कुणी नाही लागू नादी......!!
कवीत असतो आगळावेगळा भाव
मुक्तछंद सदाही त्यांचे कवी ऐसे नांव
कवितेच्या प्रेमात पडणे एवढेच त्याला ठावं
कवी काय असतो....? एका कवीलाच ठावं...
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम
*महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित*
🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳
Subscribe to:
Posts (Atom)
मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन
मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...
-
असा एक रंग (होळीनिमित्त केलेली स्वरचित कविता) असा एक रंग संस्कारांचा आचरणातून दिसावा रूसवा फुगवा इथे मात्र कुणाला कुणाचा नसावा....!! १!! ...
-
बदल्यांचं कशाला टेन्शन? बदल्यांचं कशाला टेन्शन? आहे तिथं मस्त रहायचं... झाल्या तर झाल्या बदल्या हसतखेळत ज्ञानदान करायचं....!! होईल तेंव्हा ...
-
*सोडू नये निती(अभंग क्र.५६)* कधी माणसाने | सोडू नये निती | लोकांस प्रचिती | असतेच || १|| वंशावळ खोटी| खोटेची करिती | जगा दाखविती | मोठेपण |...