माणसा कधी कुणी कुणावर ना रूसावे
माणसाला सदा वास्तवाचे भान असावे....!!
क्षणिक सुखासाठी जगतो आपण सारे
फुलपाखरासारखे जीवनगान असावे....!!
आपला आपण कशास करावा गाजावाजा
तू कोण आहेस? सा-यांनाच जाण असावे....!!
मरमर का करतो कुणास ठाऊक गड्या
खुशील जिंदगी ही अन जीवन छान असावे...!!
दुस-यांनी फिदा व्हावे रोज तुझ्यावर
असे तुझे ते कार्य तितकेच महान असावे....!!
दोन दिवसांची जिंदगी तुझी रे
पर चारचौघात तुजला मान असावे....!!
मीपणा कधी सोडून तर बघ एकदा
तेच माणसा सर्वात मोठे ते दान असावे...!!
निघून गेल्यावर आपण, अश्रू व्हावे अनावर
असे सुवर्ण अक्षरी ते पान असावे....!!
काय घेऊन बसलात वेड्या तू तर थेंब सागराचा
उडू नको हवेत राजा वास्तवाचे भान असावे...!!
कवयित्री
खूप छान आणि भाव गर्भित कविता आहेत...
ReplyDelete