आठवणींचं ओझं
नसतं कधी उतरायचं
एकमेकांत गुंतून
नसतं कधी विसरायचं...
आपलीच नातीगोती
जिवापाड जपायचं
संकटकाळात सदा
धावतपळत जायचं....
तीनही ॠतूमध्यें
आनंदाने जगायचं
आपल्याच पाठीवर
आपले ओझं वहायचं...
हसतमुख चेहरा
सदा ठेवून रहायचं
भलबुरं काय ते
आपलं आपण ठरवायचं...
चांगल्या कर्माची
चांगली फळं चाखायचं
सुखदुःखात आपल्यांना
नाही कधी विसरायचं....
काही घडो राजकारणात
आपण मस्त जगायचं
निसर्गाला एकदा
भरभरून पहायचं.....
कोण छोटा कोण मोठा
ज्याने त्याने ठरवायचं
इतरांच्या फंद्यात
कशाला उगीच पडायचं....
चारदिवसाची जिंदगी
आनंदात जगायचं
विनाकारण दुसऱ्याला
कशाला दोष द्यायचं.....
कोण श्रीमंत कोण गरीब
कशाला उगी पहायचं
अधातमधात न पडता
आपलं आपण जगायचं...
माणूसजन्म पुन्हा नाही
ध्यानी सदा ठेवायचं
माणुसकी जपायची
माणूसपण टिकवायचं....
भलेभले आलेगेले
आपण साक्षी व्हायचं
स्वार्थ्याच्या गर्तेत
नाही कधी अडकायचं...|
मोहमाया सारी
नाही इथं बसायचं....
कधीतरी स्वत:साठी
मस्त मजेत जगायचं...
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
कोकलगाव
९७६७६६३२५७
No comments:
Post a Comment