मिनू
Friday, January 6, 2023
वर्धा येथे होणा-या ९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर वाशिमच्या मिनाक्षी नागराळे यांच्या कवितेची निवड....
९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलन वर्धा येथे ३,४,५ फेब्रुवारी २०२३ रोजी आयोजित केलेल्या साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर वाशिम येथील कवयित्री कु.मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांच्या कवितेची निवड झाली आहे.आखिल भारतीय साहित्य संमेलनात दुस-यांदा त्यांच्या कवितेची निवड झाल्याने वाशिम साहित्य क्षेत्रात हा मानाचा तुरा रोवला आहे..पुर्वी ९२ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलन यवतमाळ येथे कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे यांच्या बाप या कवितेची निवड झाली होती...आता वर्धा येथे होणा-या ९६ व्या आखिल भारतीय साहित्य संमेलनातील कवी कट्ट्यावर ३/२/२०२३ रोजी दुपारी ३ ते ४ या वेळात मिनाक्षी नागराळे यांच्या करू अनांथांची सेवा या अभंगाची निवड झाली आहे.दुस-यांदा आखिल भारतीय साहित्य संमेलनात संधी मिळाल्याने वाशिम जिल्ह्याचे नाव रोशन केले आहे.त्यामुळे सर्व स्तरातून त्यांवर कौतुकाचा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...्
Subscribe to:
Post Comments (Atom)
मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन
मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...
-
असा एक रंग (होळीनिमित्त केलेली स्वरचित कविता) असा एक रंग संस्कारांचा आचरणातून दिसावा रूसवा फुगवा इथे मात्र कुणाला कुणाचा नसावा....!! १!! ...
-
बदल्यांचं कशाला टेन्शन? बदल्यांचं कशाला टेन्शन? आहे तिथं मस्त रहायचं... झाल्या तर झाल्या बदल्या हसतखेळत ज्ञानदान करायचं....!! होईल तेंव्हा ...
-
*सोडू नये निती(अभंग क्र.५६)* कधी माणसाने | सोडू नये निती | लोकांस प्रचिती | असतेच || १|| वंशावळ खोटी| खोटेची करिती | जगा दाखविती | मोठेपण |...
Very nice, Madam
ReplyDeleteThank you sir 🙏💐🙏
Delete