अष्टाक्षरी रचना
शिर्षक -आल्या श्रावणाच्या सरी
आल्या श्रावणाच्या सरी
ओलीचिंब झाली माती
रान शिवार बहरे
डोले गवताची पाती....!!
मनी उल्हास उल्हास
ऊन पावसाचा खेळ
बळी हासतो गालात
जाई शिवारात वेळ.....!!
आल्या श्रावणाच्या सरी
सण पंचमीचा येई
वाट पहाते बहीण
पौर्णिमेला भाऊ येई...!!
आल्या श्रावणाच्या सरी
माय शिवारी राबते
उभ्या पिकावर ध्यान
माय बापाला सांगते...!!
पडे पिकावर अळी
पाठी फवारणी घेतो
घाम गाळुनिया बळी
कष्ट करूनिया खातो....!!
निसर्गाचा सदा ॠणी
हात देवाला जोडतो
शेत पिकू दे विठ्ठला
असे मागणं मागतो....!
आल्या श्रावणाच्या सरी
मन जातं माहेराला
ओढ जरी संसाराची
आस बाईच्या मनाला...!! उजी
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
कोकलगाव,वाशिम

No comments:
Post a Comment