माणूस का लाचार आहे?
दडला कुठे विचार आहे?
स्वतःच स्वतःच्या नजरेत
कशाला पडतो आहेस?
स्वार्थासाठी किती किती
खोटं खोटं करतो आहेस?
काय खरे काय खोटे?
वरच्या न्यायालयात जाणार आहे
कितीही उड तू हवेत माणसा?
कर्माचा शेवटी हिशोब होणार आहे...!!
जरी डोळे मिटून पिते दूध
जात दब्या त्या मांजराची
कशी पायमल्ली होते?
माणुसकीच्या विचाराची....!!
सगळेच पैशाने विकत
दररोज घेता येत नाही
स्वत:च्या नजरेत पडलेले
पुन्हा कधीच उठता येत नाही...!!
दुर्योधनाचे काय झाले?
जिंकले होते कपटाने
सत्याच्या स़ंगतीला देव
सार सांगितले श्रीकृष्णाने....!!
पाप पुण्याचा हिशोब
शेवटी तुला मिळणार आहे
राज्यातही तेच चालू आहे
लोकशाहीला सार कळणार आहे...!
लोकशाहीला सार कळणार आहे....!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम
No comments:
Post a Comment