सरकारी शाळा..नका बंद करू...
एकेक शाळा बंद करण्याचा
कुटील डाव इथं चालू आहे
घाणेरडं राजकारण आणि
सत्तापिपासू नेता दलबदलू आहे.
लोकशाहीचा केंव्हाच यांनी
बारा वाजविली आहे
न्याय,समता,समानता फक्त
कागदावरच गाजविली आहे....
सरकारी शाळा कायमच्या बंद
त्यामुळे गोरगरिबांचे होणार हाल
सगळे कसे शांत बसलेले आहेत
अदानी,खदानी,अंबानी मालामाल...
उठा जन हो ! उठा लोकं हो !
आतातरी उघडा तुमचे डोळे
नंतर पश्चात्ताप करून काय उपयोग
इतके ही तुम्ही राहू नका भोळे...
गावोगावी काढा मोर्चे
लिहून पाठवा मंत्र्यांना पत्र
नाहीतर महिला उतरू रस्त्यावर
बंद करा तुमचे मनमानी सत्र...
पहिले चहा विकला म्हणून
आता शाळा विकायच्या का?
थोर क्रांतिकारकांचं बलिदान
असं व्यर्थ जाऊ द्यायचं का?
तुम्ही म्हणाल ती पुर्व दिशा
म्हणून नेते विकत घ्यायचे का?
अहो चहा विकला म्हणून
कुठे देश विकायचा असतो का?
वाढली सत्ता ,घुसखोरी म्हणून
इतकं स्वार्थी व्हायचं असतं का?
नका करू बंद गरिबांच्या शाळा
चाललंय म्हणून काहीही करायचं असतं का?..
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोकलगाव
ता.जि.वाशिम.

No comments:
Post a Comment