ओला दुष्काळ दुष्काळ
पडे पाऊस जोरात
पाणी साचलं साचलं
शेत आणि शिवारात...!!
आला पाऊस पाऊस
पिके पिवळी पडली
सा-या शेतात रे पाणी
पीकं पाण्यानं सडली...!!
झालं जाहीर पॅकेज
झाली पाहणी पाहणी
शेतकरी चिंताग्रस्त
नको करू हेटाळणी....!!
सहा हजार एकरी
बिबीयाणे रे निघेना
कशी केलास रे देवा
शेतक-याचीच दैना...!!
असं करू नगं देवा
येऊ दे ना थोडी कीवं
मेताकुटी येईल गा
माणसाचा मग जीवं....!!
हात जोडून देवाला
मी करीतो विनवणी
थांबू दे पाऊस अन्
नको तुझी मनमानी....!!
उसवल्या नशिबाला
आज लावितो ठिगळं
आबादाणी ठेव देवा
ठीक कर रे सगळं....!!
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
ता.जि.वाशिम
No comments:
Post a Comment