कवयित्री-मिनाक्षी नागराळे वाशिम
जायचंच जर होतं तर बाळा
इतका जीव का लावलीस?
साधभोळा स्वभाव तुझा
घरातून हसत हसत गेलीस!
परतीच्या प्रवासात बाळा
किती सोसल्यास गं यातना
हळूहळू कशी सोसलीस तू
मंदावत गेल्या जरी चेतना...!!
बाबांची लाडकी परी तू
निस्वार्थी,भोळाभाबडा स्वभाव
आईच्या कुशीतलं पिल्लू तू
आता तुला कुठं कुठं शोधावं?
एका आईचं काळीज बघ
आजही तुला शोधतंय
कृष्णा कृष्णा करत
मन सर्वत्र भटकतय....!!
तुझ्या जिवाचं सोनं झालं
मन भावनेत कसं गुंतलय
तुझ्या आठवणीचे क्षण
मनामनामध्ये जपलय...
तू जरी शरीराने गेलीस निघून
आजही तुझा वास आहे
काळजाच्या खोल कप्प्याआड
दडलेला तुझा सहवास आहे..
आठवणीने तुझ्या कृष्णा
झाल्या ओल्या डोळ्यांच्या कडा
पुष्परूपाने दरवळत रहा अन्
पडो अंगणात प्राजक्ताचा सडा...!!
जड अंतःकरणाने भावपूर्ण श्रद्धांजली
कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्रा.शाळा.कोकलगाव