मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Tuesday, May 24, 2022

मनाचा खुजेपणा...!!

*मनाचा खुजेपणा*

दिवसेंदिवस वाढत चालला इथे
माणसाच्या मनाचा खुजेपणा
माझ्यासारखे कुणीच नाही म्हणत
वाढत चालला स्वत:चा मीपणा...!!

आपल्याच दुनियेत गुंग सारे
दुनियादारीचे काही घेणे नाही
स्वार्थ, अहंभाव वाढत चालला
कधी कुणाला काही देणे नाही....!!

माणुसकी शब्द आता सांगण्यापुरता
माणुसकी फक्त शब्दातच न्हाली
विभक्त कुटुंबपद्धती जशी आली
तसतशी मग मने संकुचित झाली....!!

गोरगरीबांचे काही कुणा वाटत नाही
स्वत:पुरता परमार्थ दाखवत राही
इतरास हिनवण्यातच जन्म जाई
पाहणारा सर्व वरतून पाही....!!

नात्यागोत्यातही आजकाल तसेच आहे
वाढत चालला रोज मनाचा खुजेपणा
संपत्तीच्या मोहापायी नाही राहीला
सख्ख्या भावाबहिणीत माझेपणा....!!

गाडी,बंगला,पैसाअडका सर्व क्षणभंगूर
असू दे जिव्हाळा आणि मायेची ओल
काहीच सोबत येत नाही रे वेड्या
एकदिवस तुलाच व्हावं लागेल मातीमोल...!!

म्हणून म्हणते अजून वेळ गेली नाही
ठेवू नकोस तुझ्या मनाचा खुजेपणा
दुसऱ्याचा कधी होऊन तर बघ ना
आपोआप वाढेल तुझ्या मनाचा मोठेपणा...!!

मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७


Wednesday, May 11, 2022

जिल्हा परिषद शाळा- शफी बोल्डेकर,

 जिल्हा परिषद शाळा



आवडते मज जिल्हा परिषद शाळा

वाघीणीचं दूध मिळे शिक्षण घे बाळा ।। धृ।। 


गुरू शिष्याचे नाते हीच खरी संपत्ती

अभ्यासाची दिशा ही विद्यार्थाची प्रगती

सृजन प्रतिभेचा फुले  संस्कार मळा ।। १ ।।



रोज गुरुजींना जे भेटतील पालक

शिक्षणाचा हक्क कळे तो खरा मालक

परिवर्तन करा जीवनाचा सोहळा ।। २ ।।


राष्ट्रीय सणाला सांस्कृतिक कार्यक्रम 

बोलके विद्यार्थी झाले शिक्षकाचे श्रम

भविष्याच्या चिंतनाचा मिळे इथे डोळा ।।३ ।।


विकासाचा आराखडा समाजाचा साथी

नांदू एकीने विसरू धर्मभेद जाती

भारत देशा नेऊ उंच उंच आभाळा ।। ४ ।।


     -  शफी बोल्डेकर  ,

          कळमनुरी. 

मो. ७७९८९६७७९३

Monday, May 9, 2022

*दोन वेगवेगळ्या विषाणूच्या संयोगातून निर्माण होणारा तिसरा विषाणू म्हणजे-काईमेरा*

 *दोन वेगवेगळ्या विषाणूच्या संयोगातून निर्माण होणारा तिसरा विषाणू म्हणजे -काईमेरा कादंबरी*

      विदर्भाच्या मातीत जन्मलेले प्रसिद्ध लेखक संजय महल्ले यांची विज्ञानाधारित पहिली कादंबरी म्हणजे काईमेरा नुकतीच वाचनात आली. २०२०-२१ साली अख्ख्या जगावर कोरोना सारख्या महामारीने थैमान घातले होते. लाखो जीवांचे खूप हाल झाले.लाखो जीव व्हेंटिलेटरवर न ठेवल्याने मरण पावले. स्मशानापर्यंत जायला ही जागा मिळत नव्हती. असा भयानक काळ सर्वांनी अनुभवलाय.काईमेरा म्हणजे एका महाभयंकर विषाणू ची जन्म . कथा एका महाभयंकर विषाणूच्या जन्माचे रहस्य उलगडून दाखवणारे विज्ञानाधारित पहिली कादंबरी म्हणजे काईमेरा
       काईमेरा या कादंबरीचे लेखक संजय महल्ले अमरावती यांनी खूप अभ्यास पूर्वक इतिहास व चीनच्या चीनच्या मानवी महत्त्वकांक्षीची , युद्धखोर नीतीची आणि मगर राष्ट्रवादाची मराठी साहित्याला ओळख करून देणारे विदर्भाच्या मातीतून आपल्या वैशिष्ट्यपूर्ण भाषा रूप आणि आशयाच्या विविध संकेत आसन उगवलेली काईमेरा ही पहिलीच कादंबरी असावी. या कादंबरीचे प्रकाशन मेधा पब्लिशिंग हाऊस , अमरावती असून लेखकांचे स्वतःचे प्रकाशन आहे.याची प्रथम आवृत्ती २६ ऑगस्ट २०२० रोजी प्रकाशित झाली. या कादंबरीचे मूल्य केवळ १५० रुपये असून याचे मुखपृष्ठ कोरोना सारख्या महाभयंकर बिमारीचे दृश्य दाखवणारे,मास्क घातलेल्या व्यक्तीचे आहे. या कादंबरीची मांडणी अत्यंत उत्कृष्ट असून प्रस्तावना प्राध्यापक राजेंद्र राऊत यांची लाभली आहे. पाठराखण डॉ. संजय लोहकरे यांची लाभली आहे. ही कादंबरी सर्वांनी आवर्जून वाचावी अशीच असून ती ॲमेझॉन वर उपलब्ध आहे.
         covid-19 च्या रूपाने अत्यंत गंभीर परिणाम सर्वच देश भोगत असताना काईमेरा ही कादंबरी समस्त वैज्ञानिक जगताला डोळेसता प्रदान करते. सामरिक स्पर्धेत चीन अमेरिकेपुढे हतबल होत असतानाच शत्रूला पराभूत करण्यासाठी प्रो.यांग महाभयंकर विषाणूचा प्रयोग करू इच्छितात. ते अमेरिकेतील प्रख्यात व विषाणूतज्ञ डॉ. डेव्हिड यांना बोलावून घेतात व त्यांच्या मदतीला चीनचे प्रख्यात जैवविषाणूतज्ञ डॉ.डेव्हिड यांना चीनला बोलावून घेतात व त्यांच्या मदतीला चीनची प्रख्यात व्हॉयरॉलॉजिस्ट डॉ.फेन देतात. पुढे कथानक जसे जसे वळण घेत जाते तसतशी वाचकाची उत्सुकता वाढत जाते.
       जगावर अधिराज्य गाजवू पाहणाऱ्या चीनचा जगाला कसा धोका होऊ शकतो?  मानवी जीवन न युद्ध करता कसे संपवता येईल?  जैविकाचे शस्त्र म्हणून कसा वापर करता येईल? याची संपूर्ण तयारी चीन देश करीत होता. याचे सखोल चित्रण या कादंबरीत आले आहे. यांत्रिक दृष्ट्या प्रगत असणाऱ्या चीन या देशाचे सुरक्षा सल्लागार प्रो.यांग यांनी कोलंबिया विद्यापीठात ऍडमिनिस्ट्रेशन पोस्ट ग्रॅज्युएट कंप्लिट करीत असताना त्यांचे अमेरिकेचे मित्र डॉ. डेव्हीड यांना चीनमध्ये संशोधन करण्यासाठी बोलावतात. डेव्हिड यांनी बरीच वर्ष त्यांचा आग्रह टाळला होता.कालांतराने डेव्हिड यांच्या यांच्या एका अतिशय संशोधनाबद्दलची चर्चा प्रो.यांग यांच्या कानावर आली.काही जातीच्या वटवाघुळामुळे जिवंत मानवी शरीराला कुजवू शकतील असे महाभयंकर घातक विषाणू असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. त्याचा संसर्ग झाल्यास अतिशय वेगाने पसरू शकणाऱ्या या महामारीने संपूर्ण मानवी जीवन संकटात येईल. असा इशाराही त्यांनी दिला होता. या संशोधनासाठी डॉ.डेव्हिड यांनी अमेरिकाच नव्हे तर दक्षिण आफ्रिकेतील घनदाट जंगले ही पालथी घातल्याचे प्रो.यांग यांना समजले होते.
       प्रो.यांग यांनी तायवानवर हल्ला करून तो ताब्यात घेण्यासाठी 'ऑपरेशन १००' ही गुप्त मोहीम काढली होती. या मोहिमेत जैविक शस्त्रांचा वापर गुप्तपणे करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यासाठी प्रो.यांग यांनी डॉ.डेव्हीड यांची निवड केली होती. डॉ. डेव्हिड वर अतिविश्वास असलेल्या प्रो.यांगने जैविक युद्धाची तयारी दर्शवली होती. शास्त्रज्ञ यांना सोबत घेऊन पुरोहित यांनी एक प्लॅनिंग संरक्षण मंत्र्यांना दिलं. डॉ. डेव्हिड यांनी हॉर्स शूली दोन वेगवेगळे कोरोना विषाणू संक्रमित केले. एकाच वेळी एकत्रितपणे दिले त्यामुळे दोन विषाणूच्या युतीतून जन्माला येईल तिसरा महाभयंकर स्ट्रॉंग विषाणू काईमेरा. निसर्गात कुठेही आढळून येणार नाही असा घातक विषाणू म्हणजे काईमेरा होय.
        डॉक्टर डेव्हिड यांनी महाभयंकर विषाणूची निर्मिती केली खरी पण तो महाभयंकर न ठेवता फक्त श्वसनाचा जास्त त्रास होणाऱा विषाणू तयार केला. मला फसवलं ही बातमी जेव्हा मेजर प्रो.यांग यांना सांगितलं. तेव्हा कोणाचाच विश्वास बसेना असा झाला चिनी लष्कराने तायवान विरुद्ध ऑपरेशन 100 ही गुप्त मोहीम उघडण्याची व त्यात जैविक शस्त्र म्हणून वापर करण्यासाठी घातक विषाणूचा शोध सुरू केल्याची कुणकुण अमेरिकेला लागली होती. त्यामुळे ते ऑपरेशन फेल करण्याची जबाबदारी गुप्तहेर डॉ.डेव्हिड यांच्यावर सोपविण्यात आली. यांनी त्यांच्या स्वभाव बद्दल माहिती होते मानवी शरीर कुजणाऱ्या विषाणूची खोटी बातमी ॉक्टर डेव्हिड यांनी पसरली आणि ऑपरेशन 100 ठेवले त्याची सर्व माहिती अमेरिकेला पुरवली. एक दिवस डॉक्टर वटवाघुळ और प्रयोग करून फरार झाले जेव्हा ही बातमी समजली तेव्हा त्यांचा स्वतःवरच विश्‍वास बसेना त्याची मती गुंग झाली.
      दोन देशाचा महासंग्रामात एका महाभयंकर विषाणूचा जन्म होतो.तो म्हणजे काईमेरा. संजय महल्ले यांनी तिसऱ्या महायुद्धाची जैविक आणि जैविक युद्ध करू पाहणाऱ्या चीनची पोल-खोल अतिशय सविस्तरपणे, तपशिलासह, विनोदी प्रसंग, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा घातकी दुरुपयोग या कादंबरीच्या रुपाने प्रकाशित केला. त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन काईमेरा ही विज्ञान कादंबरी साहित्य क्षेत्रातील पहिलीच कादंबरी असावी....
      प्रत्येकाने आवर्जून वाचावी अशीच विज्ञानाधारित कादंबरी म्हणजे काईमेरा 
       लेखक संजय महाले यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...

 समीक्षिका /शिक्षिका/ लेखिका/ कवियित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि. परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता. जि.वाशिम
मोबाईल -9767663257

Tuesday, May 3, 2022

डोकं शांत ठेवायला शिका (मुक्तछंद काव्यप्रकार)

 *डोकं शांत ठेवायला शिका*(मुक्तछंद काव्यप्रकार)


कुणी कितीही भडकावलीत डोकी

भरलं कितीही डोक्यात खूळ

तरीही डोकं शांत ठेवायला शिका

उकरित बसू नका जातियतेचं मूळ...

अल्ला आणि ईश्र्वर फक्त नावंच वेगळी

स्वर्ग आणि जन्नत शेवटी एकच

मग कशाला करताय वाद

भोंग्यावरून विनाकारणच...

संविधानाने दिला आहे अधिकार

प्रत्येकाला आपापले

सण उत्सव साजरे करण्याचा

विणाकारण आजच

त्रास व्हायला लागला का इथे भोंग्याचा....

छत्रपती शिवाजी महाराजांनी

गडावरच बांधल्या मशिदी

आदर केला प्रत्येक जातीधर्माचा...

त्यांना नाही झाला त्रास कधी भोंग्याचा...

नका पेटवू डोकी तरूणांची?

नका भेदभाव करू हिंदू मुस्लिमांची

मान्य आहे आवाज कमी ठेवावा भोंग्याचा...

पण भोंगाच काढून टाका

असला अट्टाहास काय कामाचा....

शांत,संयमी रहावं जनतेनी

धर्माच्या नावाखाली माणसांचीच

डोकी कशाला भडकावायची....

ठेवा सर्वधर्मसमभाव 

जाणिव ठेवा एकतेची....

हिंदू मुस्लिम शिख ईसाई

सब है भाई भाई

प्रेम पाश में बंधे रहे तो

होगी नही लढाई....

कसं विसरून चालतील या ओळी

कळत नाही इथं कुणी

कुणाच्या तव्यावर कोण भाजतय पोळी?

नका भडकावू लोकांचा माथा

जागृत सुज्ञ नागरिकांनो

डोकं शांत ठेवायला शिका...

डोकं शांत ठेवायला शिका....



*कवयित्री*

*मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम*

Friday, April 8, 2022

संशोधनात्मक आणि संदर्भमूल्य असलेला ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी

*संशोधनात्मक आणि संदर्भमूल्य असलेला ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी*

      उस्मानाबाद जिल्ह्याचे प्रसिद्ध लेखक,प्राध्यापक एम. ए. मराठी, सेट नेट, पी.एच.डी. प्राप्त प्राध्यापक डॉ. दीपक सुभाषराव सूर्यवंशी सर यांचा आठ ते दहा वर्षाचा संशोधनात्मक ग्रंथ म्हणजे रंगनाथ तिवारी नुकताच वाचनात आला. डॉ. दीपक सूर्यवंशी सर हे मराठवाड्यातील नामांकित शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून सर्वपरिचित आहेत. प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सर यांनी २०१७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने रंगनाथ तिवारी या सदर विषयावरील सखोल संशोधनासाठी पी.एच.डी. बहाल केली. फक्त पदवी मिळविण्याकरिता अनेकजण संशोधन करणारे भरपूर मिळतात. पण एका लेखकाचा अभ्यास जगाला माहित व्हावा या उदात्त हेतूने दुसऱ्या लेखकावर लिहिणारे अत्यंत दुर्मिळच आहेत. लेखक प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सरांनी संशोधनाची शिस्त पाळूनही लेखकावर प्रचंड निष्ठा ठेवून अभ्यासपूर्ण संशोधनाचे कार्य केले आहे. डॉ. सूर्यवंशी सरांनी एका व्यक्तिमत्त्वाचा शोध घेतलाच आहे पण त्यांच्या साहित्यविश्वाचाही चिकित्सक अभ्यास देखील केल्याने नवीन पिढीला व्यक्ती आणि वाॾमय ग्रंथ रंगनाथ तिवारी हा ग्रंथ प्रेरणादायी ठरला आहे.
          रंगनाथ तिवारी या ग्रंथाचे प्रकाशन अरुणा प्रकाशन लातूर यांनी केले असून या ग्रंथाची प्रथमावृत्ती १५ ऑक्टोबर २०२१ रोजी प्रकाशित झाली सुंदर व सुरेख मुखपृष्ठ सरदार जाधव औरंगाबाद यांनी लेखक रंगनाथ तिवारी व त्यांचे साहित्य खूप सुंदर पणे रेखाटले आहे. या ग्रंथाला प्रस्तावना प्राचार्य डॉ.वसंत बिरादार महात्मा फुले महाविद्यालय अहमदपूर, लातूर यांची लाभली असून पाठराखण प्रसिद्ध लेखक भास्कर चंदनशिव यांनी केली आहे. या ग्रंथास डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने अनुदान देऊन सहकार्य केल्याबद्दल ग्रंथ अधिक मोलाचा ग्रंथ वाटतो. या ग्रंथाचे मूल्य केवळ ३५० रुपये असून व्यक्ती आणि वांॾमय त्यादृष्टीने अधिक तोलामोलाचा आहे. प्रत्येक चिकित्सक व अभ्यासू व्यक्तीने आवर्जून वाचावा आणि प्रत्येकाच्या घरी हा ग्रंथ असावा असाच आहे.
           या ग्रंथाचा विषय असलेले रंगनाथ तिवारी हे हिंदीबरोबरच मराठीतील प्रतिभाशाली लेखक म्हणून सर्वपरिचित आहेत. १९७० ते ८० च्या दशकात त्यांनी लेखनास प्रारंभ केला. सलग तीन दशके रंगनाथ तिवारी यांनी साहित्याची सेवा अखंडपणे केली. रंगनाथ तिवारी हे मुलत: मराठीभाषिक नसले तरी त्यांनी मराठीतून विपुल प्रमाणात लिहिले पण मराठी लेखकाकडून उपेक्षितच राहिले. रंगनाथ तिवारी यांनी कथा, कादंबरी, नाटक आणि स्फुटलेखन करून स्वतःचा वेगळा ठसा उमटविला आहे. प्रस्तुत ग्रंथात एकूण सहा प्रकरणे आहेत. पहिल्या प्रकरणात रंगनाथ तिवारी यांचे व्यक्तिमत्त्व आणि वांड़मयीन प्रवास त्यांच्या जीवनाची जडणघडण अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करून मुलाखत घेऊन, त्यांच्या सानिध्यात राहून सांगितली आहे. प्रत्येक व्यक्तीच्या जडणघडणीमध्ये त्याच्या सभोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, राजकीय, कौटुंबिक, पार्श्वभूमीवर त्यावर झालेले संस्कार यांचा खूप महत्त्वाचा वाटा असतो. म्हणून लेखकाने निर्माण केलेली साहित्यकृती ही खऱ्या अर्थाने त्याच्या सभोवतीच्या पर्यावरणाची निर्मिती असते.
        रंगनाथ रामदयाल तिवारी यांचा जन्म २१ जानेवारी १९३३ रोजी सोलापूर येथे संस्कृती संपन्न अशा मारवाडी कुटुंबात झाला. यांचे मूळ घराणे राजस्थानातील. तेंव्हाचे राजस्थान आजच्या इतके प्रगत नव्हते. पाऊस नसल्याने शेती पिकत नव्हती. त्यामुळे रोजगाराच्या शोधात हे कुटुंब सोलापूर येथे आले आणि तेथेच स्थायिक झाले. रंगनाथ तिवारी बालपणापासूनच अतिशय बुद्धिमान. त्यांना वाचन, संगीत, क्रिकेट याची खूप आवड होती. रंगनाथ तिवारी यांचा पिंडच मुळात शिक्षकाचा त्यामुळे क्लार्कची नोकरी सोडून देऊन शिक्षक झाले. अभ्यासाचा व्यासंग वाढतच होता. संपल्या सुरावटी, देवगिरी, बिलावल ही रंगनाथ तिवारी यांची कादंबरी. याचबरोबर उत्तम पुरुष एक वचन, मौनाची महासभा, गुरुदेव, बेगम समरू, अनन्वय, काया, परकाया असे अनेक साहित्य प्रसिद्ध आहे. मराठी कादंबरी विश्वात मैलाचा दगड ठरलेला वज्राघात, स्वामी, श्रीमान योगी, पानिपत या ऐतिहासिक कादंबर्‍या, परंपरेतील बेगम समरू ही रंगनाथ तिवारी यांची महत्त्वाची कादंबरी बहुचर्चित कादंबरी ठरली आहे.
          डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी रंगनाथ तिवारी यांचा वांड़मय प्रकाराची सुंदर ओळख करून दिली आहे. लेखकाने रंगनाथ तिवारी त्यांच्या कादंबरी लेखनाची प्रमुख बलस्थाने नोंदवली आहे. कथानक, वातावरण, प्रसंग निर्मिती, निवेदन शैली, पात्र, संघर्ष आणि भाषा इत्यादी घटकांच्या माध्यमातून रंगनाथ तिवारी यांच्या कादंबरी लेखनाचा व्यापक आढावा लेखकाने घेतला आहे. रंगनाथ तिवारी यांची ऐतिहासिक कादंबरी बेगम समरू यामध्ये स्त्री जीवन किती शोषित, पीडित होते. हे खूप मार्मिकपणे मांडले आहे. याशिवाय स्वधर्म, स्वसंस्कृती, हट्टी आणि स्त्रीत्वाचा अहंकार असलेली मुत्सद्दी, राजकारणी, शारीरिक भूक आणि वखवखलेली क्रूर आणि तेवढीच प्रेमातुर अशी स्त्री जीवनाची नानाविध रूपे त्यांच्या कादंबऱ्यांमधून उभी राहतात. रंगनाथ तिवारी यांच्या उत्तम पुरुष एक वचन या कादंबरीत ताई,उमा, हौसा आणि मावशी या स्त्री व्यक्तिरेखा जागीरदार यांच्या गडीतील निजाम कालीन स्त्री जीवनाचे वास्तव प्रस्तुत व्यक्तिरेखा मधून रंगनाथ तिवारींनी समर्थपणे मांडले आहे. १९४७ नंतर मराठवाड्यात रझाकारांनी धुमाकूळ घातला. त्यांचे संवेदन गर्भ चित्रण रंगनाथ तिवारीने प्रस्तुत कादंबरीतून केला आहे.
        डॉ. दीपक सूर्यवंशी यांनी रंगनाथ तिवारी यांचे जीवन, जीवन संघर्ष, शिक्षण त्यांची जडणघडण त्यांचे वांड़मयीन प्रेरणा, त्यांची मुल्यदृष्टी त्यांचे चौफेर व्यासंग, त्यांच्या वांड़मयीन व्यक्तिमत्त्वाचे पैलू, त्यांच्या साहित्यातील अनुभवविश्व, त्यांचे कादंबरीलेखन, मराठी वाड्मयातील कादंबरीचे अनेक प्रकार, ऐतिहासिक कादंबरीचे विशेष, क्रूर राजकारण, धार्मिक जीवन, स्त्री जीवनाचे दर्शन, साहित्यातील कलाविष्कार, मराठवाडा मुक्ती संग्रामाचे चित्रण, त्यांची कथा लिहिण्याची विविध वैशिष्ट्ये यावर सूक्ष्मपणे डॉ.प्राध्यापक दीपक सूर्यवंशी यांनी संशोधनात्मक चिकित्सा केली आहे.
       एकाच व्यक्तीवर व त्यांच्या वाड़मयीन प्रवास सर्वांसमोर मांडण्याचा कौतुकास्पद प्रवास म्हणजे रंगनाथ तिवारी हा व्यक्ती आणि वांड़मय ग्रंथ खरंच सर्वांनी आवर्जून वाचावा असाच आहे. सदरील ग्रंथ वाचताना लेखक आणि दहा वर्षे केलेली चिकित्सा जाणवल्याशिवाय राहत नाही. डॉ. दीपक सूर्यवंशी सरांची लिखाण करण्याची वेगळी हातोटी या ग्रंथामध्ये दिसून येते.
        प्राध्यापक डॉ. दीपक सूर्यवंशी सर यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा...!

समीक्षिका/ लेखिका /शिक्षिका/ कवयित्री
कु. मिनाक्षी पांडुरंग नागराळे 
जि.परि.प्राथ. शाळा कोकलगाव 
ता.जि. वाशिम 
मो. 9767663257

Tuesday, April 5, 2022

सयाजी शिंदे- देवराईचा वटवृक्ष

*स्पर्धेसाठी*

विषय: सयाजी शिंदे:देवराईचा वटवृक्ष

अभिनेता सयाजी शिंदे
देवराईचा वटवृक्ष
निसर्गाचा खरा मित्र
वृक्ष लावण्या असे दक्ष....!!

नानाविध भाषा बोलतो
गाजविले मराठी व कॉलीवूड
अभिनयाने छाप उमटवितो
गाजवले बॉलिवूड, कॉलीवूड...!!

पावणे दोन लाख वृक्ष
माळरानी देवराईला लावले
झाडे लावा झाडे जगवा
स्व कृतीतून जगास दावले....!!

सच्चा दिलाचा राजा माणसाने
ऑक्सिजन झोन तयार केला
झाडे किती महत्त्वाचे असतात
कृतीतून आपुल्या दावून गेला....!!

अभिनेता,नट ते उत्तम कलाकार
त्यांनी ओसाड माळरान फुलविले
वृक्षसंवर्धन गरज काळाची आहे
पावणेदोन लाख वृक्ष लाविले....!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जि.प.प्राथ.शाळा.कोकलगाव
ता.जि.वाशिम
मो.९७६७६६३२५७
मेल mpn1412@gmail.com

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...