मिनू

मिनूच्या कविता ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत

Friday, February 27, 2026

राजमाता जिजाऊंचे विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरवणारा अवलिया म्हणजे श्री महेश देवळे सर

 *राजमाता जिजाऊंचे विचार प्रत्यक्ष कृतीतून उतरवणारा अवलिया म्हणजे महेश देवळे सर*

       महेश देवळे सर एक उत्तम सूत्रसंचालन करणारे, सदैव चेहऱ्यावर स्मितहास्य करत आपल्या मधुर वाणीतून प्रेक्षकांचे मन जिंकणारे दिलखुलास व्यक्तिमत्व होय. 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्यांच्या कन्येचा नामकरण सोहळा व वाढदिवस अभिष्टचिंतन आणि वाशिम नगरीतल्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा गुणगौरव सोहळा सरांनी आयोजित केला होता. 
        आजच्या आधुनिक युगात, मॉडर्न युगात वाढदिवस म्हणले की केक, हार,फुगे,हॉटेल्स बुक करणे, फटाक्यांची अतिशबाजी वगैरे वगैरे मोठ्या धुमधडाक्यांनी  साजरे केले जातात. पण या सगळ्या विचारांना फाटा देत राजमाता जिजाऊ मॉं साहेबांचे विचार मराठा सेवा संघाच्या माध्यमातून नसानसात भिनलेले श्री.महेश देवळे सरांनी मुलींचे फक्त नांवच जिजाऊ न ठेवता जिजाऊंचे विचार जनसामान्यापर्यंत पोहोचविले ते म्हणजे त्यांची कन्या तिचे नाव सरांनी जिजाऊ ठेवले. फक्त नावच नाही तर पुरोगामी विचारांना फाटा देत नामकरण सोहळा आयोजित केला या सोहळ्याची सुरुवात सुरसंगीत जिजाऊ वंदनेने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षा शिवमती सुरेखाताई आरू (विभागीय अध्यक्ष जिजाऊ ब्रिगेड) प्रमुख उपस्थिती सौ. अन्नपूर्णाताई कंकाळ (वाशिम जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्षा)  होत्या.जिजाऊ वंदना झाल्यानंतर महेश देवळे सरांच्या मुलींचा म्हणजे कु.जिजाऊ महेश देवळे हिचा नामकरण करण्यात आले...त्यानंतर पाळणा गायनासाठी  जिजाऊ ब्रिगेडच्या तालुका कार्यकारिणीच्या भगिणी यांनी जिजाऊ पाळणा गायला ...सुगमसंगीताने प्रेक्षकांची मने जिंकली.तसेच जिजाऊ वंदना सौ सुनिता कढणे,वैशाली बुंधे यांनी जिजाऊ वंदनेचे गायन केले. जिजाऊं वंदना झाल्यानंतर जिजाऊंची रांगोळी अतिशय सुंदर कु.सदिच्छा दत्ता वरखडे यांनी अप्रतिम सुंदर रांगोळी मॉंसाहेब जिजाऊ यांची काढली तर संचालन कु. माधुरी बहादुरे यांनी केले. 
     छत्रपती शिवराय, राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांचे विचार फक्त सांगून किंवा ऐकून गप्प न बसता प्रत्यक्ष  कृतीतून उतरावत श्री महेश देवळे सर यांनी ' न भूतो न भविष्यती ' असा एक आगळावेगळा उपक्रम हाती घेऊन तो समाजसमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.तो म्हणजे वाशिम नगरीतल्या उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा गुणगौरव सोहळा आयोजित केला. यामध्ये शिक्षण, राजकारण, समाजकारण, आरोग्य व साहित्य अशा विविध क्षेत्रातील एकूण दहा महिलांचा गुणगौरव स्मृतिचिन्ह शाल देऊन जुनी आयुडीपी मध्ये करण्यात आला. यामध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शिक्षण व साहित्य यामध्ये मीनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासनाचा आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त शिक्षिका तसेच उपक्रमशील शिक्षिका व साहित्यिक कवयित्री शिक्षिका ), राजकारण सौ. अन्नपूर्णा ताई कंकाळ (वाशिम जिल्हा परिषदेच्या पहिल्या अध्यक्ष) व सौ पूजा विनोद खंडेलवाल (लोकप्रतिनिधी) आरोग्य- डॉक्टर वैशाली चौधरी व डॉक्टर अर्चनाताई रेघाटे (रुग्णसेवा ), समाजकारण- सो सुरेखाताई आरू सौ. सविताताई बोरकर (जिजाऊ ब्रिगेड वाशिमच्या जिल्हाध्यक्ष) साहित्य - सौ मधुरानी बनसोड (साहित्य )तसेच नवोदित लेखिका-ज्योतीताई देशमुख अशा सर्व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांचा यथोचित गुणगौरव सोहळा आयोजित करून त्यांना सन्मानचिन्ह, शाल देऊन त्यांचा गुणगौरव करण्यात आला. या आगळ्यावेगळ्या सोहळा व वाढदिवसानिमित्त महिलांचा गुणगौरव करण्यासाठी फक्त राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचे विचारच नाहीत तर माणसाचं मन,मनगट,मेंदू सशक्त असावं लागतं इतकंच नाही तर मनही मोठं असावं लागतं. अशा या महेश देवळे सरांच्या कार्याला मानाचा मुजरा... समाजातील लोकांनी सरांचा आदर्श घ्यावा असाच कार्यक्रम महेश देवळे सरांनी केला त्याबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे. 


लेखिका, कवयित्री समिक्षिका,शिक्षिका,संपादिका
मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम 
(महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित)

Saturday, February 21, 2026

वास्तवाचे भान असावे (गझलसदृश कविता)

 वास्तवाचे भान असावे ( गझलसदृश कविता)

माणसा कधी कुणी कुणावर ना रूसावे
माणसाला सदा वास्तवाचे भान असावे....!!

क्षणिक सुखासाठी जगतो आपण सारे 
फुलपाखरासारखे जीवनगान असावे....!!

आपला आपण कशास करावा गाजावाजा
तू कोण आहेस? सा-यांनाच जाण असावे....!!

मरमर का करतो कुणास ठाऊक गड्या
खुशील जिंदगी ही अन जीवन छान असावे...!!

दुस-यांनी फिदा व्हावे रोज तुझ्यावर 
असे तुझे ते कार्य तितकेच महान असावे....!!

दोन दिवसांची जिंदगी तुझी रे 
पर चारचौघात तुजला मान असावे....!!

मीपणा कधी सोडून तर बघ एकदा 
तेच माणसा सर्वात मोठे ते दान असावे...!!

निघून गेल्यावर आपण, अश्रू व्हावे अनावर 
असे सुवर्ण अक्षरी ते पान असावे....!!

काय घेऊन बसलात वेड्या तू तर थेंब सागराचा
उडू नको हवेत राजा वास्तवाचे भान असावे...!!

कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे 

Friday, January 23, 2026

मिनूच्या कविता...: शहाणपण थोडे जप पुन्हा

मिनूच्या कविता...: शहाणपण थोडे जप पुन्हा:  शहाणपण थोडे जप पुन्हा  शब्द आहेत अमुल्य वेडे जपून वापर त्याचा कर पुन्हा  शब्द असे दुधारी तलवार सये निर्मळ मनाचा काय गुन्हा....!...

सोड सोड हेवेदावे (अष्टाक्षरी काव्य)

सोड हेवेदावे (अष्टाक्षरी) सोड सोड हेवेदावे सारे जगतासी ठावे नको काढू उणेदुणे सदा आनंदी रहावे....!! काय आपण करावे आपुल्या मना पुसावे सत्याच्या शोधात सखे सदा आनंदी असावे....!! ज्याचे त्याचे असे माप आपण का ते तोलावे कुणा दुखवेल असे नाही शब्द ते बोलावे....!! सोड सोड हेवेदावे जे जे आपणासी ठावे ते इतरांसी सांगावे सदा खरे ते बोलावे....!! सोड सोड हेवेदावे आपुले कर्म ते करावे ज्याचे त्याचे तैसे कर्म ज्याचे त्यानेच भरावे.....!! आकाशाला गवसणी भाग्य थोर तुझे ठरावे सदा सा-यांचे बनून सुख जीवनी पुरावे....!! एकमेकांच्या आयुष्यात सुगंधीरूपी फुलावे प्रेमसागरात डुबू निया हळुवार तू डुलावे.....!! कार्याची ती गोड थाप कधी नाही विसरावे मरावे परी सखये किर्तीरूपी तू उरावे....!! किर्तीरूपी तू उरावे.....!! कवयित्री मिनाक्षी पांडुरंग नागराळे वाशिम

Wednesday, January 21, 2026

शहाणपण थोडे जप पुन्हा

 शहाणपण थोडे जप पुन्हा 

शब्द आहेत अमुल्य वेडे
जपून वापर त्याचा कर पुन्हा 
शब्द असे दुधारी तलवार सये
निर्मळ मनाचा काय गुन्हा....!!

अति महत्त्वकांक्षी होणं 
खरंच चांगले नाही 
तुला मात्र अस्तित्व दाखवण्याची 
फार फार घाई.....!!

लाख मोलाची मायेची माणसं 
परिघात जपून ठेवं पुन्हा 
कोणास ठाऊक कोण कसा विचार करतो
तिथे शब्दांचा काय गुन्हा?

वेळ निघून गेल्यावर कळेल
मग अपराधी वाटेल पुन्हा 
तुझे मन तुलाच विचारेल प्रश्न 
तिथे मग शब्दांचा काय गुन्हा?

अति उतावळेपणा नाही कामाचा
विचार जाब स्वतःला पुन्हा 
जाणवतील तुजला सखे सतत 
आपलेपणाच्या जपलेल्या खुणा....!!

नाही कुणी वेडे इथे 
वेळ प्रत्येकाची येते पुन्हा 
तुझे तु तूलाच विचार ना 
अति महत्त्वकांक्षी हाच गुन्हा 
अति महत्त्वकांक्षी होणं हाच गुन्हा....!!

कवयित्री 
मिनाक्षी नागराळे 
वाशिम 

Tuesday, January 13, 2026

कवी काय असतो?

 कवी काय असतो?


कवी असतो मुक्त मनाचा
कवी असतो धनी शब्दांचा 
कवी असतो निरंतर लिहीणारा 
कवी असतो मनातला बोलणारा....

कवी असतो वाचा फोडणारा
कवी असतो कवितेत जगणारा 
कवी असतो नियमात वागणारा 
कवी असतो कवितेला जागणारा....

कवी असतो मुक्त शब्दांना गुंफणारा 
कवी असतो आशेत जगणारा 
कवी असतो जागवणारा 
कवी नसतो कधीच रागावणारा.....

कवी असतो निरंतर प्रवाह 
कवी असतो स्वच्छंद 
कवी असतो शब्दांवर प्रेम करणारा 
कवी असतो शब्दांच्या प्रेमात पडणारा...

कवी नसतो कधीच रडणारा 
कवी असतो कवितेत जगणारा 
कवी असतो सदा आशावादी 
कवींच्या कुणी नाही लागू नादी......!!

कवीत असतो आगळावेगळा भाव 
मुक्तछंद सदाही त्यांचे कवी ऐसे नांव 
कवितेच्या प्रेमात पडणे एवढेच त्याला ठावं 
कवी काय असतो....? एका कवीलाच ठावं...

कवयित्री 
मिनाक्षी पांडुरंग नागराळे,वाशिम
*महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित*


🌳🌳🌳🌳🌳🌳🌳🌳

Saturday, August 2, 2025

बदल्यांचं कशाला टेन्शन?

 बदल्यांचं कशाला टेन्शन?


बदल्यांचं कशाला टेन्शन?
आहे तिथं मस्त रहायचं...
झाल्या तर झाल्या बदल्या
हसतखेळत ज्ञानदान करायचं....!!

होईल तेंव्हा होईल बदली
सदा तत्पर आणि तयार रहायचं
कुठेही सेवाच करायची आहे ना
मग ऑर्डर येईपर्यंत सेवाच करायचं....!!

शासनाचे धोरण वेगवेगळी
आपण कशाला मधात पडायचं
ज्याचं नडलं त्याने मग 
हळूच कोर्टात जायचं.....!!

आपण खरंच नशिबवान आहोत
पुण्याचं कामं सदा करायचं
आलाच वाट्याला जर का संघर्ष
धैर्याने त्याला सामोरं जायचं....!!

आज नाही तर उद्या होतीलच बदल्या
त्याचं टेन्शन आतापासून नाही घ्यायचं
खरं सुख विद्यार्थ्यांतच आहे ना
तिथेच आणि त्यांच्यातच रमायचं...!!

कवयित्री
मिनाक्षी पांडुरंग नागराळे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा
 कोकलगाव

मिनाक्षी नागराळे यांच्या वत्सगुल्मी काव्यसंग्रहाचे आंबेडकरी साहित्य संमेलनामध्ये प्रकाशन

 मिनाक्षी नागराळे (महाराष्ट्र राज्य शासन आदर्श शिक्षिका पुरस्कृत) यांच्या 'वत्सगुल्मी' संपादीत काव्यसंग्रहाचे प्रज्ञा सा...